आष्टी,पाटोदा तालुक्यासह जिल्हाभरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी -खा.बजरंग सोनवणे
केज/प्रतिनिधी
आष्टी,पाटोदा तालुक्यासह जिल्हाभरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी यांना खा. बजरंग सोनवणे यांनीदिले आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,मागील दोन ते तीन दिवसापासून आष्टी,पाटोदा तालुक्यासह अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा,उडीद, सोयाबीन पिकांबरोबर इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तरी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनातात्काळ मदत मिळवून देण्या करिता त्वरीत कार्यवाही करावी मागणी अशी लेखी पत्राद्वारे खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
Post a Comment
0 Comments