Type Here to Get Search Results !

बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 'निष्ठावंत कार्यकर्ता संवाद मेळावा' उत्साहात संपन्न.

 बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष  जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 'निष्ठावंत कार्यकर्ता संवाद मेळावा'  उत्साहात संपन्न.


 


बीड/प्रतिनिधी


बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघा तील पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थिती होती.प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यक्रम प्रसंगी कार्यकर्त्यांशी संवादसाधत बीड जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर आपल्या पक्षाने काम केले आहे.शेती आणि पाण्याचे प्रश्नही आपले सरकार आल्यावर आपण निश्चितपणे सोडवणार आहोत.यापूर्वी च जिल्ह्यासाठी विकासाचे धोरण आम्ही आखलेहोते. 

परंतु दुर्दैवाने आमचे सरकार गेले.मात्र बीड जिल्ह्यातील पाणी प्रश्न विशेषत: हातात घेऊन तडीला लावण्याचासंकल्प हाती घेऊन आपण काम करूया.शेतकरी कष्टकऱ्यांपर्यंत,सर्वसामा न्यां पर्यंत पोहोचून आपल्याला जनतेची कामे करावी लागतील.बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हे काम इमानेइतबारे करत आहे. त्यामुळे पक्षाला विक्रमी विजय मिळणारच! मात्र आता पक्षाची ध्येयधोरणे, पक्ष विचार बीड जिल्ह्या तील घराघरात घेऊन जाण्यासाठी आपल्याला कटीबद्ध व्हावे लागेल, असे आवाहन यावेळी बोलताना केले.आगामी विधानसभानिवडणुकांच्या दृष्टीने या संवादमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मी देखील पक्षाचे प्रमुख नेते,उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.आदरणीय जयंत पाटील साहेबांना बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबुतीने काम करत असल्याची ग्वाही दिली.येत्या विधानसभा निवडणुकां मध्ये जिल्ह्यातील सहाही विधानसभेत राष्ट्रवादीचा झेंडा रोवण्याचे आवाहन याप्रसंगी पक्षपदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले आहे.

Post a Comment

0 Comments