Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत कार्यालय टाकळी येथे एक दिवसीय आर्थिक साक्षरता मार्गदर्शन शिबीर संपन्न.

 ग्रामपंचायत कार्यालय टाकळी येथे एक दिवसीय आर्थिक साक्षरता  मार्गदर्शन शिबीर संपन्न.



केज /प्रतिनिधी 


केज तालुक्यातीलटाकळी येथे एक दिवसीय आर्थिक साक्षरता मार्गदर्शन शिबीर दि.१८आॕगष्ट २०२४ रोजी 

संपन्न झाले.या एक दिवसीय शिबीरामध्ये आर्थिक साक्षरतेचे महत्व

समजावुन सांगण्यातआले बहुदा ग्रामीण भागातील जनतेमध्ये वित्तीयसाक्षरते चा अभाव दिसुन येतो या अभावामुळे बऱ्याच वेळेस केंद्र सरकारच्या,महाराष्ट्र सरकारच्या आलेल्या विविध योजना तसेच पोस्ट ऑफिस,राष्ट्रीयकृत बँके मधील असलेल्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोंहोचत नाहीत.त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये वित्तीय साक्षरतेचे प्रमाण कमी आढळून आले आहे. देशातील प्रत्येक नागरिकां मध्ये वित्तीय साक्षरता अधिक प्रमाणात निर्माण होऊन प्रत्येकाने एक श्रीमंत आणि समृद्ध असे नागरी जीवन जगावेतसेच फसव्या योजनांमध्ये आपला अनमोल असा घामाचा,कष्टाचा,पैसा गुंतवून बऱ्याच प्रमाणात पॉन्जी स्कीम (अर्थात फसवणूक करणाऱ्या) योजनांच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली जाते ही फसगत टाळावी यासाठी भारत सरकारच्या राष्ट्रीय वित्तीय शिक्षा केंद्र व भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड (सेबी ) चे वित्तीय प्रशिक्षक  (फायनान्शिअल ट्रेनर) श्री.गणेश चौधरी ज्यांची नियुक्ती बीड,धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व लातूर अशा चार जिल्ह्यां साठी केलेली आहे.

शासनाच्या विविध योजना

वर त्यांनी टाकळी येथे ग्रामपंचायतकार्यालयाच्या माध्यमातून ग्रामस्थांना पोस्ट ऑफिस तसेच राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असलेल्या बचतीच्या, विम्याच्या,पेन्शनच्या असलेल्या विविध योजना व त्यांचे फायदे ग्रामस्थांना समजावून सांगितले व या योजनांच्या माध्यमातून आर्थिक प्रगती व आर्थिक व्यवस्थापन कसे चांगल्या पद्धतीने होऊ शकते ?याचे मार्गदर्शन केले तसेच म्युच्युअल फंड सारख्या सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या योजनेचे देखील मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर आयुष्यमान भारत सारख्या आरोग्य विषयक योजनेचे देखील मार्गदर्शन केले.यावेळी 

उपस्थितांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या.

ऑनलाइन फ्रॉड वफसव्या योजना कशा पद्धतीच्या असू शकतात?तसेच कमी वेळेमध्ये अधिक परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या पॉन्जी स्कीम्स कशा असू शकतात व त्या पासून कसे सावधराहायचे याचे देखील मार्गदर्शन व खबरदारी घेण्याच्यासूचना करण्यात आल्या.हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी टाकळी च्या सरपंच सौ.सुनीताताई घुले,उपसरपंच कलावती ताई बारगजे,अनंतकुमार  घुले,युवानेते श्रीकांत घुले  व इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी परिश्रमघेतले  तसेच या शिबीराला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार श्रीकांत घुले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments